"मायी वाडवळी कविता."
"कोपभर शा,त्यात टिबाभर दुद !"
कोपभर शा,
त्यात टिबाभर दुद !
करुन देव्याही माला भोठीबाय,
मानत अहे माला तिया पुत !
जकले हांगव्याये 'भोठ्याबाबा',
काका आमसा भोठा !
पदवी ही नुसती नावा पुरतीस,
जकला जनम गेला खोटा !
वाडीवाळे आमी वाडीकर,
रेलते फक्त नांवाला !
साऊळ पावसाळी पिकवत होते,
बिजा देवावरस हवाला !
तिनव्या पोर्यास,पोरान पोटी,
जनम नय घेतला !
पण हयात गेली फुकट अहा,
ध्यास नय त्यायीन घेतला !
भोठीबाय गोरी,ऊश्शी,
नाकिडोळी निटस !
जवानीत ते दिखत अहेन,
जकल्या जणीत ती सरस !
भोठ्याबाबा सांब सदाशिव,
निष्कपट न भोळा !
पदरी पडला पवित्र झाला,
लावला तिन लळा !
माई,आशा,उषा या,
तिन त्यांशा पोर्या !
गरीबी अवडी घरा दारा,
विणल्या हुंबाया दोर्या !
भोठ्याबाबा रानात जाई,
नोकरी त्यायी जंगल कुपात !
भोठीबाय एखली कही,
रेलेन मंग वरोरा सुखात ?
माणकु,मालती,मनु या,
तिन तिया देराण्या !
भावलाणी अहुन नय केल्या तिनं,
कोणशा कव्वास कहाण्या !
मुकुंद,मोरेश्वर,काशिनाथ,
होते तिन तिये देर !
कव्वास मानलं नय नातं ये,
हमजली ती आपली पोरं !
माई भोटी,उषा लानी,
मनशी आशा ठरली वेडी !
एक टक पावुन हाअत रेव्यायी,
नय काढली कोणशी खोडी !
माई परणली भोट्या घरा,
उषाला लागली हळद !
पण आशा गायब झाली,
कोणालास नकळत !
दु:ख झाले बिज्यांनाव पण,
दोगंस रेले कुढत !
आयुष्यायी गाणी गायली,
त्यांयीन रडत रडत !
दाजी,भोठ्याबाबा गेला,
देवकुराणी रेली एकाकी !
एखलीस मंग रेव्या लागली,
आमशी भोठी ही काकी !
हक्काळशी उठुन हालं,हाळकुंडा,
बहत रेव्याय ती कुटत !
कोण काय बोलते आयकव्या नय ती,
फुकाय आयुष्य होतं वाटत !
लोकांयं जवा रांदण हिजव्या,
यीही हावळी जात सुलीत !
पंस पकवानं होडुन दिलती,
जेवण जेव्यायी मुळमुळीत !
दोन वहरं मी वरोरला हिकव्या,
होतो दहावी,अकरावीत !
घरशे जकले दुर होते,सुलत भाहास,
भाहा न होते माया मनाये मित !
पाना तवा फुटला काकीला,
पावला तिनं मायात पोर !
हाअत होती पावुन मायातटे,
हलका करव्यायी जिवाया घोर !
रोज हक्काळशी हावळी,भोंगेरी,
सुलीत तिया पेटत !
कोंदट,कुडाया,धुरकट घरात,
आयुष्य होती ती रेटत !
रोज हक्काळी रामाया पारी,
हाक तियी येव्यायी !
"सुहास,ये रं माया पोरा,
वेळ झाली शा पेव्यायी !"
जळकट टोप,कळकट कोप,
त्यात शा ती ओतव्यायी!
अधीरता अहे तिया मनात,
बशी माया ओठाला टेकव्यायी !
नव्हता नुसता शा,अमृत ते होते,
त्यात भुकीस नय,टाकव्यायी ती प्रेम जिव्हाळा !
एक कोप शा वरतीस वाढला,
जकली माया,जकला लळा !
दिही उलटले,मयने,वहरं गेली,
अंतिम घडी ती आली !
दीन बिचारी भोठीबाय,
जकल्याना होडुन गेली !
आज त्यांशा घठाणावर,
नाही दिवा पेटत !
खंत कोणाला वाटे नय पण,
मला नय ये पटत !
कोपभर अहव्या शा, त्यात तवा,
पडव्याय टिबाभर दुद !
भोठीबाय होती 'आय' मायी,
न मी होता तवा तिया पुत !
:समाप्त:
कवि:—
सुहास काशिनाथ राऊत/ वरोरकर.
सी—१०,रामजी पार्क सोसायटी,
डहाणु रोड (पुर्व),पिन—४०१ ६०२.
मोबाईल/वाॅटसअप—९९२३००४८९५.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.