Suhas

Suhas Raut

मी सुहास काशिनाथ राऊत,वयाच्या पासष्टीत आहे.वरोर,तालुका—डहाणु,जिल्हा—पालघर हे माझं गांव.वडील कै.श्री काशिनाथ केशव राऊत हे वरोरच्या वाडीआळीतील तर आई कै.सौ.शशिकला (पुर्वश्रमीची मनु पांडुरंग पाटील) ही पण वरोरच्याच पाटील आळीतील.०८ आक्टोबर १९५३ ला वरोरला आजोळी माझा जन्म झाला.आम्ही ३ भाऊ,३ बहिणी.माझा नंबर तिसरा.त्या वेळी "हम दो!हमारे दो!"चा नारा नव्हता.नाहीतर माझा तिसरा नंबर लागलाच नसता. वडील राज्य पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक,नोकरीच्या अखेरच्या कालखंडात शिक्षण विस्तार अधिकारी होऊन सेवानिवृत्त झाले.आई गृहीणी.वडीलांना समाजसेवेचीही आवड होती.आम्ही सोमवंशी पाठारे क्षत्रिय ( वाडवळ) समाजातले.सदर समाजाचे अध्यक्षपदही वडीलांनी भुषविले.वडील अभ्यासात हुशार होते.पुर्वीच्या फायनल ( ईयत्ता ७ वीच्या) परीक्षेत ते ठाणे जिल्ह्यात प्रथम आले होते,तर प्राथमिक शिक्षकांच्या पी.टी.सी.(आताच्या डी.एड.समकक्ष) परीक्षेत ते महाराष्ट्रात प्रथम आले होते.त्यांना लेखनाची आवड होती.त्यांच्या २५० कथा,कविता,लेख,२५ नियतकालिकांतुन प्रसिध्द झालेल्या आहेत. मला लेखनाचा वारसा त्यांच्या कडुनच लाभला.वडीलांच्या नोकरी निमित्त आम्ही वरोर,निर्मळ,सातपाटी,तलासरी,बोर्डी,चिंचणी येथे राहिलो. माझे प्राथमिक शिक्षण वरोर व तलासरीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत,तर माध्यमिक शिक्षण ठक्करबाप्पा हायस्कुल,तलासरी व के.डी.हायस्कुल,चिंचणी येथे झाले.खासदार कै.श्री चिंतामण वनगा हे माझे वर्गमित्र,आम्ही तलासरीला ईयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंत एका वर्गात शिकलो.एफ.वाय. व इंटर आर्टसला मी मुंबईच्या पार्ले काॅलेजला होतो. परिस्थितीवश नोकरी करणे भाग पडल्याने मी एप्रिल १९७४ ला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात मिळालेली निम्नस्तर लिपिकाची पहिलीच नोकरी पकडली.पुढील शिक्षण बाहेरुन करण्यासाठी पुणे विद्यापीठ तसेच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठात प्रवेश घेतला पण संसार व नोकरी या मुळे बी.ए.होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. पेण,डहाणु,तलासरी,पालघर,बोईसर,वसई येथे ३७ वर्षे नोकरी करुन आॅक्टोबर २०११ ला ऊच्चस्तर लिपिक पदावरून सेवा निवृत्त झालो.सेवानिवृत्ती नंतरही ५ वर्षे जानेवारी २०१६ पर्यंत विद्युत मंडळात बाह्यश्रोत पध्दतीने काम करीत राहिलो.जुलै २०१६ पासुन एका सुरक्षा एजन्सीत काम करीत आहे.सध्या डहाणु पुर्वेला कॅनरा बॅंकेत आहे. वयाच्या बावीसाव्या वर्षी १४ आॅक्टोबर १९७५ ला नरपड, (दक्षिण आळी)तालुका—डहाणु,जिल्हा—पालघर येथील कु.कल्पना अरूण पाटील,त्या वेळचे वय वर्षे १६ हिच्याशी प्रेमविवाह झाला.एक मुलगा वय वर्षे ४१ व एक मुलगी वय वर्षे ३८ आहेत.दोघां कडुन वय वर्षे १३ व वय वर्षे ३ चे नातु आहेत. २५ वर्षे वाणगांवला वास्तव्य होते ११ वर्षांपासुन डहाणुला वास्तव्य आहे. वयाच्या १८ व्या वर्षी माझी पहिली कथा प्रसिध्द झाली.आज पर्यंत २५ नियतकालिकांतुन १०० च्या वर कथा,कविता,लेख व स्फुट लेखन प्रसिध्द झाले आहे. वाॅटसअप व फेसबुकवरही मराठी व बोलीभाषा वाडवळीत लेखन करतो.दिनांक २८ जानेवारी २०१८ ला सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नती संघ ट्रस्ट फंडाचा "सौ.जया लीलाधर चौधरी—पुरस्कृत लेखक/ कवी प्रोत्साहनपर गुणवंत गौरव पुरस्कार"मिळाला आहे. —सुहास काशिनाथ राऊत/ वरोरकर,डहाणु,09923004895.

माझी कविता—"भेट श्री गणेशाची आणि मायबाप येशुची!"

1699

:माझी कविता:

     स्पेन मध्ये अघटीत घडले. श्री गणेश मिरवणुक जाण्याचा मार्ग गिरीजाघरावरुन जात होता. सहिष्णु श्री गणेश भक्तांनी चर्च मार्गावरुन श्री गणेशाची  मिरवणुक नेता येईल का म्हणुन संबंधितांना विचारले.
     "अहो श्री गणेशाला चर्च समोरुन न्यायचंच काय विचारता? श्री गणेशाला चर्चमध्ये घेऊन या, मगच जा."
     असा सर्व धर्म समभावात्मक दुजोरा मिळाला. या घटनेवर मला सुचली ही माझी कविता.

"भेट श्री गणेशाची आणि मायबाप येशुची !"

गणपती आणि येशुची,
आज स्पेनला झाली भेट !
"नेऊ का चर्चच्या दारावरुन?" विचारले फादरला,
म्हणाले "आणा कि चर्च मध्येच थेट !"

गणपती आणि येशुचा,
आधी झाला असेल का संवाद ?
म्हणाले असतिल का एक दुसर्‍याला,
"पाहु या,काय होतो वितंडवाद ?"

गणपती आपला विश्वव्यापी,
येशुही जगत आधार !
भक्त दोघांचे विशाल हृदयी,
केला एक दुजांचा सत्कार !

"गणपती बाप्पा मोरया !" ची साद,
ऐकली मेरी बाळ येशुने !
भरुन आले हृदय दोन देवांचे,
उभय भक्तगण नाचती खुषीने !

म्हणाला असेल फादर त्यांचा,
" 'मदर', 'माय',एकच असते !
भक्ती देवाची असो वेगळी,
शक्ती भक्तीची सारखीच असते !"

ईथे मात्र श्री गणेशाच्या देशात,
बसतो गणपती अनेक रुप,वेशात !
प्रत्येकाचा गणाधीश असतो वेगळा,
देव एकच पण का आत्मा वेगळा ?

लालबागचा राजाच का असतो श्रेष्ठ ?
शेजारचा गणोबा का मानावा 
कनिष्ठ ?
आकृती वेगळी,प्रकृती एक,
अलग निष्ठा सकलांच्या,
पण असते भक्ती नेक !

मंदिर, मस्जिद कि असो गिरीजाघर,
गुरुव्दारा वा अन्य प्रार्थना घर !
नमते मान भक्तांची तेथे,
जिथे भक्ताचे स्वत्व संपते !

मानव जात मानुनी एक,
जगु सकल बनुनी नेक !
गणेश येशुच नव्हे,
देव सकलांचे एकत्र नांदतील,
भक्त आरती प्रेअर अन्य प्रार्थना गातील !
नमन असो त्या सर्व देवा,
वाटो न कुणाला कुणाचा हेवा !

मन असेल घर देवाचे,
अमूर्त रुप जिथे भगवंताचे !
अशा भक्तीस्तव एकत्र येऊ,
भगवंताचे सकल गुण गाऊ !

कवि:—
सुहास काशिनाथ राऊत/वरोरकर,
डहाणु रोड, (पुर्व).
मो.०९९२३००४८९५.

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

6 + 0=    get new code
Post Comment